जासं, उत्तर प्रदेश: बभनान ऊस समिति च्या सामान्य निकाय ची बैठक सोमवारी झाली. यामध्ये ऊस सुरक्षा, बजेट सह अनेक महत्वाच्या मुदयांवर चर्चा झाली. सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला की, गाळप हंगाम 2020-21 मध्ये समिति क्षेत्रातील ऊस बभनान साखर कारखान्याला दिला जाईल.
विनोद सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांची थकबाकी त्यांना व्याजासहित दिली जावी. ऊसाला 450 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा. क्षेत्रातील माझा मानपुर गांवात एक नवे क्रय केंद्र उघडण्याची मागणी करण्यात आली. बभनान साखर कारखान्याचे उप महा व्यवस्थापक आरसी राय यांनी सांगितले की, बभनान साखर कारखान्याने आतापर्यंत 87 टक्के ऊसाचे देय भागावले आहे. उर्वरीत 13 टक्के थकबाकी लवकरच भागवली जाईल. तसेही थकबाकी भागवण्यामध्ये आमचा कारखाना सर्वात पुढे आहे. यावेळी समिति चे सचिव मोतीराम, प्रमोद सिंह, उपेंद्र सिंह, आजाद सिंह, अजय तिवारी, गुरुशरण, सत्यनारायण पटेल उपस्थित होते.