युपी : साडेचार एकरातील ऊस आगीत जळून खाक

सुल्तानपूर : अलहदादपूर गावातील उसाच्या शेताला रविवारी दुपारी अचानक आग लागली. यामध्ये शेतकऱ्यांचा लाखो रुपये किमतीचा ऊस जळून खाक झाला. ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवले.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अलहदादपूर गावातील उसाच्या शेतांमध्ये दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणातच आग आसपासच्या शेतांमध्ये पसरली. शेतातून धूर येत असल्याचे पाहून ग्रामस्थ एकत्र आले. त्यांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. यादरम्यान, अलहदादपूरमधील कृष्ण भूषण सिंह, शशिभूषण सिंह, आनंदकुमार सिंह, रामआधार, शशिकला, पवन सिंह पाच बिश्वा तसेच बनमई गावातील राम अवतार, राम उजागीर आदींचा ऊस जळून खाक झाला. आगीत पिक जळाल्याची माहिती शेतकऱ्यांनी सरकारी यंत्रणेला दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here