ऊसाचा दर 550 रुपये प्रति क्विंटल व्हावा: खासदाराची मागणी

धामपूर: नगीना लोकसभा क्षेत्रातील बसपा खासदार गिरीशचंद यांनी ऊस शेतकर्‍यांच्या वाईट अवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. खासदारांनी राज्याच्या मुखमंत्र्यांना पत्र लिहून शेतकर्‍यांना आगामी गाळप हंगामात ऊसाचा दर 550 रुपये मिळण्याची मागणी केली आहे. खासदाराने सीएम यांना पाठवलेल्या पत्रात सांगितले की, केंद्र सरकारकडून गेल्या आठवड्यात ऊसाचा 2020-21 विपणन वर्षासाठी एफआरपी चा दर 10 रुपयांनी वाढवून 285 रुपये प्रति क्विंटल करण्याला मंजूरी दिली आहे. मंत्रिमंडळ समितीचा हा निर्णय कृषी खर्च आणि किंमती आयोगाच्या शिफारसी नुसारच आहे. पण ज्या प्रकारे खत, विज आणि डीजेल चे दर वाढल्यामुळे शेतकर्‍यांचा खर्च वाढला आहे. त्या प्रमाणे ऊसाचा उचित दर 500 ते 550 असला पाहिजे. एकीकडे सरकारचा शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट कसे वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचा विचार आहे तर दुसरीकडे शेतकर्‍यांना त्यांच्या पिकांचे योग्य पैसेही मिळत नाहीत. आताही ऊस शेतकर्‍यांचे लाखो करोडो रुपये साखर कारखान्यांकडून देय आहेत. याप्रकारे शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होणार नाही. तर शेतकरी अधिक कर्जात जाईल. ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून ऊसाची किंमत 10 रुपये एफआरपी वाढवून 285 केली आहे, जी खूपच कमी आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here