जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सॅनिटाइज करण्याचे डीसीओनी दिले निर्देश

बिजनौर: जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या अधिकार्‍यांना कारोनाच्या फैलावापासून बचावासाठी साखर कारखान्यांना सॅनिटाइज करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सोशल डिस्टसिंग आणि मास्कचा प्रयोग करण्याचेही आदेश दिले आहेत. बिजनौर साखर कारखान्यात कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत.

बिजनौर साखर कारखान्याला सॅनिटाइज केले जात आहे. कारखाना कॉलनीलाही सॅनिटाइज केले जात आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांमद्ये दुरुस्तीचे काम सुरु आहे. कोरोनापासून सावधानतेसाठी जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी साखर कारखान्यांच्या अधिकार्‍यांना साखर कारखाना सॅनिटाइज करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत की, कारखान्यांना सॅनिटाईज करुन घ्यावे, आणि सर्व कर्मचार्‍यांनी सोशल डिस्टसिंग बरोबरच मास्कचाही वापर करावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here