सीतामढी, बिहार: ऊस उत्पादक संघाच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी शेकडो ऊस शेतकर्यांनी हातामध्ये ऊस घेवून शेतकरी भवन पासून कारखान्याच्या परिसरापर्यंत निदर्शने केली. शेतकर्यांनी मागणी केली होती की, रीगा साखर कारखान्याचा गाळप हंगाम वेळेत सुरु व्हावा. शेतकर्यांच्या शेतात उभ्या असणार्या ऊसाची पूर्ण खरेदीची हमी असावी. गेल्या वर्षीच्या ऊसाचे पैसे अजूनही कारखान्यांवर देय असून, ते पैसे लवकर दिले जावेत. चालू हंगामामध्ये पुरवठा केल्या जाणार्या ऊसाचे पैसे 14 दिवसांच्या आत मिळावेत. संघाचे अध्यक्ष नागेंद्र प्रसाद सिंह यांनी सांगितले की, केसीसी कडून घेण्यात आलेल्या कर्जाचे पूर्ण देय हे कारखाना व्यवस्थापनाने द्यावे. व्यवस्थापनाने हे पैसे भागवण्याचे आश्वासन दिले आहे. वेळेत कारखाना चालू करुन ऊसाची खरेदी पूर्ण करणे आणि 69 करोड रुपयांची प्रलंबित थकबाकी लवकरात लवकर भागवण्याचे आश्वासन दिले आहे.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.