महाराष्ट्रात आतापर्यंत १०२.४८ लाख टन साखर उत्पादन

पुणे : महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर गाळप हंगामात सहभाग घेतला. आता हंगाम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ७ एप्रिल २०२१ पर्यंत १८९ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात भाग घेतला. राज्यात ९७९.०६ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. एकूण १०२४.८३ लाख क्विंटल (१०२.४८ लाख टन) साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४७ टक्के इतका आहे.
सद्यस्थितीत कोल्हापूर विभागात ६ साखर कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत ३१ कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर विभागात सर्वाधिक ४३ कारखान्यांनी ४ एप्रिल २०२१ पर्यंत गाळप केले. यातील ४३ कारखाने आता बंद झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १११ साखर कारखाने बंद झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here