मध्य प्रदेशमध्ये इथेनॉल उत्पादन वाढीसाठी लवकरच धोरण: गृह मंत्री मिश्रा

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये धान्यावर आधारीत उद्योगांसाठी लवकरच एक धोरण आखले जाणार आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली. १५ जून रोजी कॅबिनेटच्या बैठकीनंतर ते बोलत होते. राज्यात इथेनॉल उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

मंत्री मिश्रा म्हणाले, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्व विभागांना याबाबत सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांप्रमाणेच आता मध्यप्रदेशमध्येही इथेनॉल उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल असे सरकारचे म्हणणे आहे.

खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, देशात इथेनॉल आसवनीची क्षमता २०२५ पर्यंत दुप्पट होईल आणि भारत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे आपले उद्दीष्ट निश्चितच पूर्ण करू शकतो.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here