साखर कारखान्याच्या शिष्टमंडळाने घेतली ऊसमंत्र्यांची भेट

काशीपूर : साखर कारखान्यातील फिटमेंट, मृत कामगारांच्या वारसांबाबतच्या अडचणी दूर करण्याची मागणी करत शुक्रवारी साखर कारखान्याच्या पाच कामगार संघटनांच्या प्रतिनिधी मंडळांच्या संयुक्त संघटनेचे अध्यक्ष वीरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ऊस मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांची भेट घेतली.

रुद्रपूर येथे संयुक्त मोर्चाचे अध्यक्ष विरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली. यांदरम्यान त्यांनी आपल्या अडचणी ऊस मंत्र्यांसमोर मांडल्या. साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांसमोर मुख्यत्वे फिटमेंटची समस्या आहे. ही समस्या सोडविण्याची मागणी मंत्र्यांसमोर करण्यात आली. याशिवाय मृत कर्मचाऱ्यांवरील अवलंबित्व असणाऱ्यांचे प्रश्न, कंत्राटी कामगारांची स्थिती आदी मागण्या यावेळी मांडून त्या सोडविण्याची विनंती करण्यात आली. ऊस मंत्र्यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी गुरमीत सिंह सीटू, आशू तिवारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here