अररिया : बिहारच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता साखर कारखान्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. राज्य सरकार ऊस आणि मक्क्यापासून इथेनॉलपासून उत्पादनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती ऊस आणि कायदा मंत्री प्रमोद कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
मंत्री प्रमोद कुमार म्हणाले, सीमावर्ती भागात उसाचे उत्पादन अधिक होते. आता बिहारमधील सर्व जिल्ह्यांत इथेनॉल उत्पादनासाठी युनिट सुरू केले जाणार आहेत. देशभरातील उद्योजक बिहारमध्ये गुंतवणुकीस इच्छुक आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष सुराणा, माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आलोक भगत, नारायण कुमार झा, माजी आमदार लक्ष्मी नारायण मेहता, जिल्हा उपाध्यक्ष नवीन यादव, पप्पू झा, आयटी सेल जिल्हा संयोजक शुभम कुमार चौधरी, राहुल झा, कृष्ण कुमार सेनानी, बमबम कुमार साह आदी उपस्थित होते. त्यानंतर महसूल, जमीन सुधारणा आणि ऊस, कायदा मंत्री प्रमोद कुमार यांचा भाजप नेते आलोक कमार यांनी सत्कार केला.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link