ट्रायडेंट साखर कारखाना सुरू करण्याची मागणी

हैदराबाद : तेलंगणा सरकारने ट्रायडेंट साखर कारखाना पुन्हा सुरू करावा अशी मागणी तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे (टीपीसीसी) अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांनी केली आहे. रेड्डी हे महसूल विभागाच्या मुख्यालयात आयोजित एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा करताना रेड्डी यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकरी पूर्णपणे खासगी साखर कारखान्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांना आपले पीक इतर ठिकाणी घेऊन जाण्याशिवाय पर्याय राहात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे.

जहीराबाद विभागातील शेतकऱ्यांसाठी २००० कोटी रुपये का वितरीत केले जात नाहीत अशी विचारणा रेड्डी यांनी राज्य सरकारला केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी ट्रायडेंट साखर कारखाना आपल्या ताब्यात का घेतला जात नाही? असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकार कारखान्याशी संबंधीत जमीन अचल संपत्तीमध्ये बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. टीपीसीसी अध्यक्ष रेड्डी यांनी सरकारने कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न करावेत. जर यामध्ये यश आले नाही तर शेतकऱ्यांना आपला ऊस कर्नाटकमध्ये गाळपास नेण्यासाठी सरकारनेची व्यवस्था करावी अशी मागणी केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here