नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रणाचे धोरणाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. द्वारिकेश शुगरचे कार्यकारी संचालक विजय बांका यांनी मंगळवारी सांगितले की, कंपनी आर्थिक वर्ष २०२२ मध्ये पाच कोटी लिटर इथेनॉल विकण्याच्या मार्गावर आहे. बांका यांनी सीएनबीसी टीव्ही १८ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, एका महिन्यात कंपनीकडे नवे टेंडर येणार आहे. दुसऱ्या तिमाहिती कंपनीने १.६७ कोटी लिटर इथेनॉलची विक्री केली आहे. पहिल्या तिमाहीत विक्री करण्यात आलेल्या १.१ कोटी लिटर इथेनॉलच्या तुलनेत कंपनीची विक्री वाढल्याचे दिसून येत आहे. द्वारकेश शुगरने ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत चांगली कामगिरी केल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे प्रमुख बांका यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
कंपनीचा महसूल गेल्या आर्थिक वर्षातील या तिमाहीमधील ४१७ कोटी रुपयांच्या तुलनेत २१.१२ टक्क्यांनी वाढवून ५०६ कोटी रुपये झाले आहे. वार्षिक तुलनेत गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तिमाहीत ४६ कोटी रुपयांच्या महसुलाच्या तुलनेत ७५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर मार्जिन १५ टक्क्यांच्या तुलनेत ११ टक्क्यांपेक्षा अधिक होता.