हंगाम २०२१-२२ : महाराष्ट्रात १५३ साखर कारखाने सुरू

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, २५ नोव्हेंबर २०२१ अखेर महाराष्ट्रात एकूण १५३ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. यामध्ये ७५ सहकारी तर ७८ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. एकूण १८०.९९ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत १६२.३७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ८.९७ टक्के इतका आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वाधिक ३७ साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. साखर आयुक्तालयाकडील माहितीनुसार, २५ नोव्हेंबर २०२१ अखेर विभागाने ४२.९६ लाख टन ऊस गाळप करून ३४.९९ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. येथे साखर उतारा ८.१४ टक्के आहे.

कोल्हापूर विभागात साखर उतारा १० टक्क्यांवर आहे. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन या विभागातच झाले आहे. कोल्हापूर विभागात ४८.३९ लाख टन ऊस गाळप करून ४९.३५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथे साखर उतारा १०.२० टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here