कोल्हापुर विभागातील साखर उतारा १०.५० टक्क्यांवर

महाराष्ट्रातील साखर कारखाने यंदा साखर उत्पादनात चांगली कामगिरी करीत आहेत. साखर उत्पादन आणि साखर उतारा या दोन्हीमध्ये राज्यात कोल्हापुर विभाग पहिल्या क्रमांकावर आहे.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, १४ डिसेंबर २०२१ अखेर कोल्हापुर विभागातीतल साखर उतारा १० टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापुर विभागातच झाले आहे. कोल्हापुर विभागात ८३.११ लाख टन ऊस गाळप करून ८८.७९ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. येथील साखर उतारा १०.६८ टक्के झाला आहे.

हंगाम २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात एकूण १८५ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९३ सहकारी आणि ९२ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ३३०.८९ लाख टन ऊस गाळप केले आहे. राज्यात आतापर्यंत ३१०.३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.३८ टक्के आहे.

सोलापूर विभागात सर्वाधिक साखर कारखाने सुरू आहेत. येथे आतापर्यंत ४३ साखर कारखाने सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here