चंदौली : कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात अॅग्रोक्लायमेटिक झोनअंतर्गत आयोजित तीन दिवसिय कृषी मेळाव्यात शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती आणि सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे सीडीओ अजितेंद्रनारायण यांनी विविध स्टॉल्सला भेट दिली. शेतकऱ्यांना जैविक शेतीसह सरकारकडून सुरू असलेल्या शेतीसंबंधीत योजनांबाबतही चर्चा केली.
यावेळी अजितेंद्रनारायण म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना सुरू आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती, कृषीयंत्रांचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करावा.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जिल्हा कृषी अधिकारी वसंत दुबे यांनी उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव केला. कृषी वैज्ञानिक डॉ. रितेश गंगवार यांनी गोशेतीबाबत माहिती दिली. यावेळी एएफसी संस्थेचे हरिओम तिवारी, प्रगतशील शेतकरी संजय सिंह, वीरेंद्र सिंह यांसह शेतकरी उपस्थित होते.