आरा : उद्योग मंत्री सय्यद शाहनवाज हुसेन यांनी सांगितले की, राज्यात चार इथेनॉल प्लांट उद्घाटनासाठी तयार आहेत. मंत्री हुसेन यांनी रमणा मैदानात चार दिवसीय राष्ट्रीय MSME एक्स्पोचे उद्घाटन करताना सांगितले की, मार्च महिन्यात भोजपूरमध्ये प्रतीदिन ४ लाख लिटर इथेनॉल उत्पादन करण्याची क्षमता असलेल्या उत्तर भारतातील सर्वात मोठ्या इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले जाणार आहे.
त्यांनी सांगितले की, तीन आणखी इथेनॉल प्लांटपैकी गोपालगंजमध्ये दोन तर पुर्णिया येथे एकाचे लवकरच उद्घाटन केले जाईल. मंत्री हुसेन यांनी सांगितले की, केंद्र सरकारने बिहारमध्ये आणखी १५ इथेनॉल प्लांट स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. भोजपूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजद्वारे आयोजित एक्स्पोचे उद्घाटन बिहार विधान परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष शाहवनवाज आणि अधवेश नारायण सिंह यांनी संयुक्तरित्या केले. अवधेश नारायण सिंह यांनी सांगितले, भोजपूरमध्ये कृषी आधारित औद्योगिक युनिट स्थापन करण्याच्या खूप संधी आहेत.


