हसनपूर साखर कारखाना गाळप समाप्तीच्या मार्गावर

हसनपुर : हसनपूर साखर कारखाना लवकरच ऊस गाळप बंद करणार आहे. ऊसाअभावी दररोज कमी क्षमतेने कारखाना चालवावा लागत आहे. त्यामुळे साखर कारखआना योग्य पद्धतीने सुरू नाही. कारखान्यातील ऊस गाळप बंद होणार असल्याची माहिती मिळाल्याने उर्वरीत शेतकरी ऊस तोडणीत व्यस्त आहेत. कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना गळीत हंगामाची समाप्ती होार असल्याची माहिती दिली आहे. यावर्षी आतापर्यंत ४९ लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. कारखान्याचे ६० लाख क्विंटल गाळपाचे उद्दीष्ट होते. शेतकऱ्यांना आतापर्यंत १ अब्ज ३७ कोटी १७ लाख रुपयांची ऊस बिले अदा करण्यात आली आहेत.

कारखान्याने वसंतकालीन सत्रासाठी ९६३४ एकरात ऊस लागण केली आहे. तर २६ हजार एकरात ऊस लागणीचे उद्दीष्ट ठेवले आहे. कारखान्याचे ऊस विभागाचे उपाध्यक्ष शंभू प्रसाद राय यांनी सांगितले की, १४ मार्च रोजी गाळप बंद केले जाईल. ज्या शेतकऱ्यांकडे ऊस उपलब्ध आहे, त्यांनी तो या मुदतीपर्यंत कारखान्याकडे पाठवावा. कार्यक्षेत्रातील अनेक ठिकाणच्या उसाला पुराचा फटका बसला असल्याचे सांगण्यात आले. पुरामुळे ऊस तोडणी कठीण बनली. तसेच कामगारांची टंचाई शेतकऱ्यांना सतावत होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तोडणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here