अकोला : केंद्र सरकारने तांदूळ, ज्वारी आणि मक्क्यापासून इथेनॉल उत्पादनास परवानगी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. इथेनॉल उत्पादनातून शेतकरी इंधन उत्पादक बनण्यासह आर्थिक समृद्ध होऊ शकतील असे ते म्हणाले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांनी अकोला शहरात दोन फ्लायओव्हरचे उद्घाटन केले. या समारंभा दरम्यान ते बोलत होते.
ते म्हणाले की, अमरावती-अकोला महामार्ग आणि इतर रस्त्यांची कामे सुलभ बनविण्यासाठी आणि जल संरक्षणासाठी अमृत सरोवर अभियानांतर्गत प्रशासन अकोला जिल्ह्यात ३६ तळ्यांची निर्मिती करणार आहे.
नितीन गडकरी हे देशाला नेहमी इथेनॉल उत्पादनासाठी प्रोत्साहित करीत आहेत. सरकार इथेनॉल उत्पादन वाढीसाठी विविध उपाययोजना करीत आहे. परिणामी गेल्या काही वर्षात देशभरात इथेनॉल उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.












