नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास केंद्र सरकारचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले. सरकार या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहे, असे ते म्हणाले. तोमर यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, देशाच्या कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दर देत त्यांचे उत्पन्न वाढविणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे कोणताही कार्यक्रम, योजना शेतकऱ्यांच्या हिताचीच असेल.
हिंदुस्थान समाचारमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, तोमर म्हणाले की, केंद्र सरकार बागायती शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहे. याच अनुषंगाने केद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालयाने बागायती क्लस्टर विकास कार्यक्रम (सीडीपी) तयार केला आहे. त्याच्या आढाव्यासाठी मंत्री तोमर यांच्या अध्यक्षखाली बैठक झाली. यास राज्यमंत्री कैलाश चौधरीही व्हर्च्युअल माध्यमातून सहभागी होते. देशातील अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, मणिपूर, मिझोरम, झारखंड, उत्तराखंड आदी राज्यगी ५५ क्लस्टरमध्ये समाविष्ट करावेत अशी सूचना तोमर यांनी अधिकाऱ्यांना केली.