गुड न्यूज : RBI ने रेपो रेट ५० बेसिस पॉइंट्ने घटवले; गृहकर्ज होणार स्वस्त

मुंबई : आरबीआय ने सर्वसामान्य भारतीयांना रेपो रेट ५० बेसिस पॉइंट्ने कमी करून सुखद धक्का दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज झालेल्या MPC (Monetary Policy Committee) च्या बैठकीत हा निर्णय घेतला. रेपो रेट तब्बल ५० बेसिस पॉइंटने कमी करण्यास बैठकीतील सहा सदस्यांनी मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे व्याजदर हे ६ टक्क्यांवरून थेट ५.५ टक्क्यांवर आले आहेत. याशिवाय, गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशातील महागाईचा दर चालू आर्थिक वर्षासाठी ३.७ टक्के राहील, असे म्हटले आहे. गेल्या महिन्यात आरबीआयनं रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणले होते. त्याआधीच्या महिन्यात ते ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आणले होते. आता ते आणखी ५० बेसिस पॉइंटनं घटवले आहेत. त्याआधी सलग ६ महिने आरबीआयनं व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केले नव्हते.

रेपो रेट म्हणजे काय ?

रेपो रेट अर्थात व्याजदर म्हणजे आरबीआयकडून देशभरातल्या बँकांना देण्यात येणाऱ्या निधीवर आकारण्यात येणारे व्याज. या व्याजदरात कपात झाल्यास पुढे बँकांकडूनही कर्जावरील व्याजदरांमध्ये कपात केली जाऊ शकते. त्यामुळे कर्जदारांना, विशेषत: घर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या दीर्घकालीन गृहकर्जावरील व्याजदर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी भारताच्या जीडीपीबाबतही अंदाज वर्तवला. चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग ६.५ टक्के राहू शकतो असं ते म्हणाले. तिमाहीनुसार ही टक्केवारी एप्रिल ते जूनदरम्यान २.९ टक्के, जुलै ते सप्टेंबरदरम्यान ३.४ टक्के, ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान ३.९ टक्के तर पुढील वर्षी जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत हा दर ४.४ टक्के इतका राहू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here