सांगली : राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी साधला ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद

सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी जक्राईवाडी, लाडेगाव, ऐतवडे बुद्रुक व वशी आदी गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले. संचालक दीपक पाटील, अमरसिंह साळुंखे, रावसाहेब पाटील, सचिव डी. एम. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी नितीन पाटील, गट अधिकारी प्रणिल पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष पाटील यांनी, ऊस तोडीपासून कारखान्याच्या संबंधित कोणताही प्रश्न असू द्या, आपण थेट संपर्क करा. तातडीने लक्ष घालू. अडचणींचा पाठपुरावा करून त्या नक्की सोडवू, असे आवाहन शेतकऱ्यांना केले.

अध्यक्ष पाटील म्हणाले की, गेल्या हंगामात तोडणी यंत्रणेकडून ज्या चुका झाल्या, त्या या हंगामात होणार नाहीत याची काळजी घेऊ. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. यावेळी दीपक पाटील यांचे भाषण झाले. ऐतवडे बुद्रुकचे सरपंच सुभाष कुंभार, शहाजी गायकवाड, राजेंद्र दिंडे, संदीप गायकवाड, कलगोंडा पाटील, नंदकुमार गायकवाड, महेश कांबळे, प्रमोद गायकवाड, लाडेगावचे श्रीपती पाटील, सुखदेव पाटील, हौसराव दाईगडे, सर्जेराव निंबाळकर, प्रतापसिंह पाटील, शिवाजी पाटील, अमोल पाटील, वशी येथे प्रशांत पाटील, भगवान पाटील, जगन्नाथ पाटील, अमृत पाटील, जक्राईवाडीचे सरपंच दिग्विजय माने, निवास गायकवाड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here