माळेगाव साखर कारखान्याच्या कामगिरीचा राज्यात ठसा उमटवू : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा यापुढील काळात कारभार पूर्ण पारदर्शक असणार आहे. ऊस शेतीला खर्चाच्या तुलनेत बाजारभाव देण्यासाठी आम्ही कायम तत्पर राहणार आहे. शिवाय जिल्हा बँकेच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजाने अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे. उद्योग व्यवसाय, शिक्षणासाठीही कर्ज पुरवठा करण्यास आम्ही कोठेही कमी पडणार नाही. यापुढील काळात सभासद केंद्र स्थानी ठेवून माळेगावचा सर्वांगिण विकास करणार आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. माळेगाव (ता. बारामती) निवडणुकीत गुरुवारी (ता. १९) श्री निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचारार्थ सभासदांशी संवाद साधताना बोलत होते.

माळेगाव साखर कारखान्याचा चेअरमन मी स्वतः होणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी पुन्हा केली. ते म्हणाले की, एका खास प्लॅनद्वारे माळेगाव कारखाना विकासाच्या मार्गावर आणणार आहे. चेअरमन म्हणून मी खर्चीत बसल्यानंतर खंबीर आणि निर्णय घेण्यासाठी तप्तर राहणार आहे. संचालक मंडळासह सभासदांनी अशा चेअरमनला काम करण्याची संधी द्यावी. राज्याच्या कानाकोपऱ्यात कोठेही असलो तरीही माळेगावबाबत कामाचा ठसा उमटविल्याशिवाय राहणार नाही. रविवार (ता. २२) रोजी मतदान आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सभासदांना मतदान करता येणार आहे, असे पवार यांनी आवर्जून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here