अहिल्यानगर : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊस उत्पादन खर्चात ३० टक्के बचत होऊन उत्पादन सव्वा ते दीडपट वाढते. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी केले. कारखाना कार्यस्थळावर बारामती कृषी विकास प्रतिष्ठान, कृषी विद्या विभाग मॅप माय क्रॉपचे संचालक डॉ. भूषण गोसावी व कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने एआय तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यकारी संचालक सुहास यादव म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रती एकरी ऊस उत्पादन वाढावे म्हणून कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर धडक कृती कार्यक्रम राबवत आहेत. शास्त्रोक्त पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवावे, याबाबत जाणीवपूर्वक मार्गदर्शन देत आहेत. डॉ. भूषण गोसावी यांनी मार्गदर्शन केले. माजी उपाध्यक्ष कैलास माळी यांनी अनुभवांचे कथन केले. उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी आभार मानले. संचालक त्र्यंबक सरोदे, विश्वास महाले, ज्ञानेश्वर होन, ज्ञानदेव औताडे, बाळासाहेब वक्ते, निवृत्ती बनकर, बापू बारहाते, विलास माळी, डॉ. गुलाबराव वरकड, अंबादास देवकर, नवनाथ आगवण, साहेबराव रोहोम, भीमराव भुसे, विजय रोहोम यांच्यासह संजीवनी उद्योगसमूहातील विविध उपस्थित होते.