मेरठ : राज्याचे ऊस आयुक्त प्रमोद कुमार उपाध्याय यांनी सर्व साखर कारखाने आणि कृषी विभागाला ३० जूनपर्यंत ऊस सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या राज्यात ४६.८४ लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांपैकी ३७.६२ लख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ऊस आयुक्त प्रमोद कुमार उपाध्याय यांनी कोणत्याही परिस्थितीत ३० जूनपर्यंत ऊस सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील एकूण ४६.८४ लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांपैकी ३७.६२ लाख शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. ऊस सर्वेक्षण कामात पारदर्शकता आणि अचूकता येण्यासाठी, ७०१४ कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक जीपीएसने सुसज्ज ४७०० हँडहेल्ड संगणकांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम करत आहेत.