पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनेलने २९ पैकी २० जागांवर विजय मिळवला आहे. अजित पवार यांनी गुरू-शिष्य समजल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे जोडीला धक्का देत कारखान्यावर एक हाती सत्ता मिळवली आहे. माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांचा फक्त विजय झाला असून माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांना धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एकूण २१ जागांपैकी बुधवारी (ता. २५) सायंकाळी जाहीर झालेल्या निकालात चंद्रराव तावरे यांचा अपवाद वगळता इतर सर्व जागांवर निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी झाले. पॅनेलच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्यानंतर प्रशासकीय भवन समोर समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. निवडणुकीमध्ये पवार यांनी ‘तुम्ही माझ्याकडे बघून मतदान करा, पाच वर्षे तुम्हाला राज्यातील पहिल्या पाच क्रमांकामधील भाव देतो,’ असा शब्द दिला होता. ‘मीच कारखान्याचा अध्यक्ष असेन,’ असेही त्यांनी जाहीर केले होते, त्यांच्या या आवाहनाला सभासदांनी साथ देत त्यांच्या पॅनेलला निर्विवाद बहुमत मिळवून दिले.
ब वर्ग संस्था प्रतिनिधी – अजित पवार- नीलकंठेश्वर पॅनेल ९१ (विजयी) तर भालचंद्र देवकाते- सहकार बचाव पॅनेल- १०
भटक्या विमुक्त जाती व जमाती – (विशेष मागास मतदारसंघ) विलास ऋषीकांत देवकाते- नीलकंठेश्वर पॅनेल-८९७२ (विजयी), सूर्याजी देवकाते सहकार बचाव पॅनेल- ६५९८
इतर मागासप्रवर्ग – नितीन वामनराव शेंडे -नीलकंठेश्वर पॅनेल ८४९४ (विजयी), रामचंद्र नाळे -सहकार बचाव पॅनेल ७३४१
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग – रतनकुमार भोसले – नीलकंठेश्वर पॅनेल ८६७० (विजयी), बापूराव गायकवाड – सहकार बचाव पॅनल-७९८२
महिला राखीव प्रवर्ग – संगीता कोकरे – नीलकंठेश्वर पॅनेल ८४४० (विजयी), ज्योती मुलमुले – नीलकंठेश्वर पॅनेल ७५७६ (विजयी), राजश्री कोकरे – सहकार बचाव पॅनेल ७४८५, सुमन गावडे – सहकार बचाव पॅनेल – ६०९९
माळेगाव गट – शिवराज जाधवराव -नीलकंठेश्वर पॅनेल – ८६१२ (विजयी), राजेंद्र बुरुंगले- नीलकंठेश्वर पॅनेल ८११६ (विजयी), बाळासाहेब तावरे – नीलकंठेश्वर पॅनेल-७९४६ (विजयी), रंजनकुमार तावरे – सहकार बचाव पॅनेल ७३५३, संग्राम काटे – सहकार बचाव पॅनेल ६७०१ रमेश गोफणे – सहकार बचाव पॅनेल ६३०२
पणदरे गट – योगेश जगताप – नीलकंठेश्वर पॅनेल ८६३५ (विजयी) स्वप्नील जगताप – नीलकंठेश्वर पॅनेल- ७९३३ (विजयी), तानाजी कोकरे – नीलकंठेश्वर पॅनेल ८४९५ (विजयी), सत्यजित जगताप – सहकार बचाव पॅनेल ६२३२, रणजित जगताप – सहकार बचाव पॅनेल ६१३४, रोहन कोकरे – सहकार बचाव पॅनेल ७०८३
अजित पवार यांनी बोललेले करून दाखविले…
कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरू-शिष्य समजल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांच्या जोडीला जोरदार धक्का देत कारखान्यावर एकहाती सत्ता राखली आहे. माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांचा विजय झाला असून, रंजनकुमार तावरे यांना धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले आहे. त्यावर, ‘अजित पवार यांनी बोलले ते करून दाखविले…’ या शब्दांत कार्यकर्त्यांनी भावना बोलून दाखवली.
माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा
चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव व सभासदांशी असलेला संपर्क विचारात घेता पैनलला यश मिळेल, असा सहकार बचाव पॅनलला विश्वास होता. मात्र, निवडणुकीच्या प्रचारामध्ये अजित पवार यांनी, ‘माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा, पाच वर्षे तुम्हाला राज्यातील पहिल्या पाच क्रमांकामधील भाव देतो, असा शब्द दिला होता. तसेच, मौच कारखान्याचा अध्यक्ष असेन,” असेही त्यांनी जाहीर करत विरोधकांच्या प्रचारातील हवा काढून घेतली. त्यांच्या या आवाहनाला सभासदांनी साथ देत त्यांच्या पॅनेलला निर्विवाद बहुमत मिळवून दिले. त्यामुळे आता अजित पवार हेच माळेगाव कारखान्याचे नवीन अध्यक्ष असतील, हेही स्पष्ट झाले आहे.
स्वतःच्या उमेदवारीने रंगत
आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहोत, हे बाजूला ठेवत तब्बल आठवडाभर बारामतीत थांबून एक उमेदवार व पॅनेलप्रमुख या नात्याने वाडीवस्तीवर जात प्रचार करत नाराजी दूर करून माळेगाव कारखान्याची सत्ता अजित पवार यांनी अक्षरशः खेचून आणली. निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करावे लागते ते सर्व करत आपण मुत्सही आहोत, सभासददेखील पाठीशी आहेत, हेच त्यांनी सिद्ध करून दाखवले. बारामतीत आजही त्यांचाच शब्द प्रमाण आहे, मतदारसंघातील संस्थांवर त्यांची मजबूत पकड आहे, हे यानिमित्ताने पुढे आले.
नियोजनाचा अभाव, मतमोजणीला ३६ तास
नियोजनाचा अभाव व एकूणच मतमोजणीचा अंदाज न आल्याने माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी आजवरच्या इतिहासातील सर्वांत प्रदीर्घ काळ चाललेली मतमोजणी ठरली. मंगळवारी (ता. २४) सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली हो प्रक्रिया बुधवारी (ता. २५) संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सुरू राहिली. तब्बल ३६ तासांहून अधिक काळ जागे राहाण्याचा विक्रमही काही कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या निमित्ताने नोंदविल्याची चर्चा मतमोजणी केंद्रामध्ये होती. मतमोजणी करताना टेपतची संख्या वाढविष्यासह कर्मचारी संख्या वाढविण्याची गरज असताना ते का करण्यात आले नाही? असा प्रश्न उमेदवार, कार्यकर्त्यांनी केला.