पुणे : भीमाशंकर कारखाना ऊस शेतीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार

पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धती ऐवजी आधुनिक ऊसाची शेती करण्याकडे वळावे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विकसित केलेली औषधे, भीमाशंकर कारखान्याने जैविक प्रयोगशाळेत उत्पादित जीवाणू खतांचा वेळोवेळी वापर केल्यास उस उत्पादन वाढीसाठी फायदा होईल. यासाठीच यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीचा अवलंब करणार आहे, अशी माहिती भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील यांनी केले. अवसरी बुद्रुक येथे कारखान्यामार्फत ऊस विकास योजना, आडसाली लागवड, व्यवस्थापन, एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेती याविषयी मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.

प्रदीप वळसे पाटील म्हणाले की, सहकार महर्षी दत्तात्रय वळसे-पाटील लक्ष २०२०च्या हेक्टरी १३० मेट्रिक टन सरासरी ऊस उत्पादनाचे उदिष्ठ असलेल्या महत्वाकांक्षी उस योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. यावेळी उपसरपंच अनिल हिंगे पाटील म्हणाले की, अवसरी बुद्रुक गावडेवाडी व तावरेवाडी या ऊस क्षेत्रासाठी मागील अनेक वर्षांपासून आम्ही अवसरी बुद्रुक येथे गट कार्यालयाची मागणी करत आहोत. ती पूर्ण करावी, याचबरोबर कारखान्याने अग्नीशामक वाहन घ्यावे. त्याचा कारखाना व इतर परिसरातील गावांना फायदा होईल. कारखान्यामार्फत प्रत्येक गावात २०० झाडे लावावी. अशोक भोर यांनी सूत्रसंचालन केले. मच्छिंद्र गावडे यांनी आभार मानले. यावेळी कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर, रामचंद्र ढोबळे, शांताराम बापु हिंगे, मच्छिंद्र गावडे, माऊली आस्वारे, रामहरी पोंदे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, संजय बाणखेले, सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे पाटील, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, दिनकर आदक, सोमेश्वर दीक्षित, छाया चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here