२०२५-२६ मध्ये जागतिक साखर उत्पादन १८५.९ दशलक्ष टन होण्याचा अंदाज : Czarnikow

लंडन : २०२५-२६ हंगामात जागतिक साखर उत्पादन १८५.९ दशलक्ष टन होण्याचा अंदाज Czarnikowने वर्तवला आहे. जर हा उत्पादनाचा स्तर गाठला गेला तर २०१७-१८ या हंगामानंतर ते दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी साखर उत्पादन असेल. उत्तर गोलार्धातील अनेक ठिकाणची ऊस पिके आता वाढीच्या सर्वोच्च टप्प्यात प्रवेश करत आहेत. या दरम्यान पिकाच्या निरोगी वाढीसाठी पुरेसा पाऊस आवश्यक आहे. भारतात यावर्षी पिकाचा उतारा चांगला अपेक्षित आहे. तो मुख्यत्वे मान्सूनवर अवलंबून आहे. उत्तर गोलार्धातील साखर बीट पिकांसाठीदेखील हा काळ महत्त्वाचा आहे. तथापि, उत्तर आणि पश्चिम युरोपमध्ये पावसाचा अभाव हा गंभीर चिंतेचा विषय आहे. कारण जमिनीतील ओलावा पातळी हंगामी दृष्ट्या कमी झाली आहे. आम्ही हवामान परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहोत आणि आवश्यक असल्यास आमचा अंदाज सुधारू, असे झारनिकोव्हने म्हटले आहे.

जागतिक साखरेचा वापर कमी होईल…

अहवालात पुढे म्हटले आहे की, साखरेच्या वापरासाठीचा आमचा अंदाज हळूहळू कमी होत आहे. आमच्या मागील अपडेटपेक्षा आमचा अंदाज १.१ दशलक्ष टनांनी कमी झाला आहे. आता आम्हाला वाटते की २०२६ मध्ये जागतिक साखरेचा वापर १७८.३ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचेल. २०२५ मध्ये किंवा येणाऱ्या काळात आम्हाला लक्षणीय वाढ अपेक्षित नाही. अन्नधान्याच्या किमतीतील महागाई, साखरेच्या सेवनाबद्दल वाढती आरोग्य जागरूकता आणि जीएलपी-१ औषधांचा वाढता प्रभाव ही यामागील कारणे आहेत.

आम्हाला चिंता वाटते की, ओझेम्पिक आणि झेपबाउंड सारख्या जीएलपी-१ रिसेप्टर अ‍ॅगोनिस्ट औषधांच्या उदयामुळे जागतिक स्तरावर साखरेचा वापर कमी होईल असे झारनिकोव्हने म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, हे फक्त २०२५ आणि २०२६ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्येच होण्याची शक्यता आहे, जिथे अनेक ग्राहक ही औषधे घेऊ शकतात. तथापि, २०२६ मध्ये अनेक देशांमध्ये सेमाग्लुटाइड (ओझेम्पिक) चे पेटंट कालबाह्य होईल. यावेळी, औषध उत्पादक स्वस्त बायोसिमिलर सोडू शकतील, ज्यामुळे उपलब्धता वाढेल. यामुळे इतर कमी श्रीमंत देशांमध्ये मागणीदेखील वाढेल. जीएलपी-१ वापराचा वाढता परिणाम लक्षात घेऊन आम्ही २०२४ पासून अमेरिकेसाठी वापरातील घट समाविष्ट केली आहे, जी २०२५ आणि २०२६ मध्ये बहुतेक जी २० देशांमध्ये पसरेल.

भारताचे उत्पादन ३२ मिलिटन टनापर्यंत वाढण्याची शक्यता

आमचे अनुमान आहे की, २०२५-२६ मध्ये उत्पादन अधिशेष ७.५ दशलक्ष टन असेल. २०२० पासून झालेल्या साठ्यातील घटीचा एक भाग जग पुन्हा निर्माण करेल. २०१७-१८ हंगामानंतरचा हा सर्वात मोठा उत्पादन अधिशेष असेल. यावर्षीच्या निराशाजनक ऊस तोडणीनंतर, २०२५-२६ मध्ये भारतीय उत्पादन ३२ दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. ऊस तोडणीचा उतारा मान्सूनच्या पावसावर अवलंबून असेल. यावर्षी मान्सूनचा पाऊस नियोजित वेळेपूर्वी झाला. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील जलाशयांमध्ये पाण्याची पातळी पूर्ववत होण्यास मदत झाली आहे. त्याचा वापर शेतकरी मान्सूननंतरच्या कोरड्या काळात सिंचनासाठी करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here