पुणे : भाटघर, वीर धरणातील पाण्याचे शुगरकेन सोसायटीतर्फे पूजन

पुणे : येळवंडी नदीवर बांधलेल्या भाटघर व वीर धरणाच्या जलाशयाचे माळीनगर येथील शुगरकेन विकास सोसायटी आणि सासवड माळी शुगर फॅक्टरी संस्थेच्या सभासदांकडून श्रीफळ सोडून जलपूजन करण्यात आले. गेली कित्येक वर्षे ही जलपूजेची प्रथा या दोन्ही संस्थांच्या सभासदांनी जोपासली आहे. १० जुलै अखेर भाटघर धरणात ७६ टक्के आणि वीर धरणात ८२.२० टक्के पाणी साठा झाला आहे. माळीनगर येथील शेतकऱ्यांनी प्रथम हे धरणाचे पाणी १९३२ सालापासून घेण्यास सुरवात केली. भाटघर धरणातील पाणी वीर धरणात येऊन ते डावा व उजव्या कालव्यातून सहा तालुक्यांना दिले जाते.

यावेळी सासवड माळी शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष राजेंद्र गिरमे, शुगरकेन सोसायटीचे अध्यक्ष अमोल ताम्हाणे, उपाध्यक्ष कपिल भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक कुणाल इनामके, सुरेश राऊत, जयवंत चौरे, मनीष रासकर आदींनी जलपूजनाची भूमिका बजावली. ही प्रथा पाळणारी तिसरी पिढी आहे. ज्या वेळेस भाटघर व वीर धरण पूर्ण झाले, त्याचे पाणी राज्यात प्रथम माळीनगर पाणीपुरवठा सहकारी सोसायटी स्थापन करून ब्रिटिश काळात या पाण्याचा करार करणारी पहिली सोसायटी म्हणून जलसंपदा विभागाकडे नोंद आहे. दोन्ही धरणात साठणाऱ्या पाण्याची पूजा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here