पाकिस्तान : साखर, गहू घोटाळ्याची चौकशी करा – माजी पंतप्रधान इम्रान खान यांची मागणी

इस्लामाबाद : तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि त्यांनी ३०० अब्ज रुपयांच्या गहू खरेदी घोटाळ्याची आणि साखरेच्या किमतीत फेरफार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. ‘एक्स’वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये खान यांनी गहू आणि साखरेशी संबंधित दोन मोठ्या आर्थिक घोटाळ्यांची त्वरित चौकशी करण्याची मागणी केली. साखरेच्या किमतीत वाढ झाल्याने कारखानदारांना सुमारे ३०० अब्ज रुपयांचा फायदा झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

इम्रान खान यांनी गहू घोटाळ्याचा संबंध पंजाबमधील २०२२ च्या काळजीवाहू सरकारशी जोडला. त्या सरकारचे नेतृत्व मोहसीन नक्वी यांनी केले होते. नक्की हे आता गृहमंत्री आहेत. खान यांनी अलिकडच्या साखर संकटासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या सरकारला जबाबदार धरले. यास जबाबदार असलेल्यांना शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. इम्रान खान म्हणाले की, “देशाने विचारले पाहिजे की या घोटाळ्यांचे काय झाले? कोणाला जबाबदार धरले जात आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये चौकशी आणि न्यायाची मागणी करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

जनतेमध्ये वाढत्या अन्न महागाईबद्दल वाढत्या निराशेच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य आले. माजी पंतप्रधान खान यांनी त्यांच्या तुरुंगवासाचे वर्णन राजकीय मतभेद दडपण्याच्या व्यापक मोहिमेचा एक भाग म्हणून केले. त्यांनी दावा केला की त्यांना दोन वर्षांहून अधिक काळ एकांतवासात ठेवण्यात आले आहे. कायदेशीर सल्ला, कौटुंबिक बैठका आणि मीडिया बैठकींना प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की त्यांना त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांना भेटण्याचीही परवानगी नाही आणि या परिस्थितीला “त्यांचे मनोबल तोडण्याचा” जाणीवपूर्वक प्रयत्न म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here