पंजाब : उसाची थकीत बिले लवकरच देण्याचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांचे आश्वासन

चंदिगड : खासगी कारखान्यांनी खरेदी केलेल्या उसाच्या दरापैकी पंजाब सरकारच्या वाट्याची थकबाकी लवकरात लवकर दिली जाईल, असे आश्वासन अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी ऊस उत्पादक शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले. त्यांनी आपल्या कार्यालयात ऊस उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी शेतकरी समुदायाच्या कल्याणासाठी राज्य सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ऊस बिले उशीरा मिळाल्यामुळे उत्पादकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी समजून घेत, सरकार पैसे देण्याची प्रक्रिया जलद करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यातील शेतकऱ्यांना उत्पादनाचा वेळेवर मोबदला मिळावा यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी बैठक घेण्यापूर्वी, अर्थमंत्र्यांनी ग्रामपंचायत पाणीपुरवठा पंप ऑपरेटर्स असोसिएशन, पंजाब पोलिस कोरोना वॉरियर्स, स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संस्था आणि दंगल पीडित कल्याण सोसायटी यांसारख्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. बैठकांमध्ये संघटनांच्या मागण्या आणि समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला. या प्रतिनिधींनी मांडलेल्या सर्व खऱ्या मागण्या आणि समस्या प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश अर्थमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले. या बैठकींमध्ये, माढा किसान संघर्ष समितीचे अध्यक्ष बलविंदर सिंग राजू, दोआबा किसान समितीचे अध्यक्ष जंगवीर सिंग चौहान, पंजाब पोलिस कोरोना वॉरियर्सचे अध्यक्ष गुरबाज सिंग, ग्रामपंचायत पाणीपुरवठा पंप ऑपरेटर्सचे अध्यक्ष बंत सिंग, स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संस्थेच्या शाखांचे अध्यक्ष चित्तन सिंग मानसा आणि मेजर सिंग आणि दंगल पीडित कल्याण सोसायटीचे अध्यक्ष सुरजीत सिंग आदींनी आपले मुद्दे मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here