उत्तर प्रदेश : चार ऊस खरेदी केंद्रे स्थालातरीत केल्यामुळे शेतकरी संतप्त, आंदोलनाचा इशारा

बुलंदशहर : सरकारने स्याना परिसरातील चार ऊस खरेदी केंद्रे स्थलांतरित केल्याबद्दल शेतकरी संतप्त झाले आहेत. ही खरेदी केंद्रे आता दुसऱ्या साखर कारखान्याला देण्यात आली आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. ही केंद्रे त्याच कारखान्याला वाटप करण्याची मागणी त्यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी स्याना परिसरातील शेतकरी, केवल प्रधान, प्रेमवीर राघव, नेपाळ सिंग, देवेंद्र सोलंकी, जगमोहन सिंग, राजपाल सिंग, सरदार सिंग बाबा, नरेश कुमार, अनुज कुमार, सतीश कुमार पूनिया आणि सुधीर त्यागी आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, आम्ही चित्सुना २, बीबीनगर ४, थाल इनायतपूर २ आणि बहपूर २ या खरेदी केंद्रांवर ऊस विक्री करत होतो. ही चार खरेदी केंद्रे गेल्या वर्षापर्यंत साबितगढ साखर कारखान्याकडे होती. परंतु आता ही केंद्रे अनामिका साखर कारखान्याला देण्यात आली आहेत. या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यांनी ही केंद्रे साबितगड साखर कारखान्याकडे पूर्ववत द्यावीत अशी मागणी केली. दरम्यान, याविषयी जिल्हा ऊस अधिकारी अनिल कुमार भारती यांनी सांगितले की, अद्याप कोणत्याही साखर कारखान्याला खरेदी केंद्रे वाटप केलेली नाहीत. यावर सरकार निर्णय घेईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here