उत्तर प्रदेश : ऊस खरेदी केंद्रांवरील काटामारी विरोधात भाकियू अराजकीयने केली निदर्शने

मुझफ्फरनगर : ऊस खरेदी केंद्रांवर वजनात हेराफेरी होत असल्याचा आरोप करत भारतीय किसान युनियन (अराजकीय) च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी संघटनेने विविध मागण्यांचे निवेदन दिले. जिल्ह्यातील विविध ऊस खरेदी केंद्रांवर वजनात प्रति क्विंटल अंदाजे २ ते ३ किलोचा फेरफार केला जात आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी एक पथक स्थापन केले, परंतु पथकातील कोणताही अधिकारी घटनास्थळी चौकशीसाठी किंवा शेतकऱ्यांच्या तक्रारींना उत्तर देण्यासाठी भेट देत नाही, असा आरोप भाकियू अराजकीयचे प्रदेशाध्यक्ष अंकित चौधरी यांनी केला.

चौधरी यांनी राज्य सरकारने क्रशरवर निर्बंध लादले आहेत. १५ किलोमीटर क्षेत्र मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही तात्काळ प्रभावाने मागे घ्यावी. ही अट शेतकऱ्यांच्या हिताविरोधात आहे, असे सांगितले. यावेळी शशिकांत त्यागी, पिंटू ठाकूर, वसीम खान, सुभाष मलिक, सत्येंद्र मलिक, सलमान, एजाज आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here