देशातील साखर उत्पादन २२५.३० लाख टनांवर पोहोचले; अद्याप ४५४ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू : NFCSF

नवी दिल्ली: देशातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहचला आहे. १४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत साखर उत्पादन २२५.३० लाख टनांवर पोहोचले आहे, जे मागील हंगामात १९७.८० लाख टन होते. नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSF) च्या आकडेवारीनुसार, १४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत देशातील ५३४ साखर कारखान्यांचा ४५४ गाळप हंगाम सुरु आहे. देशात एकूण २४१९.५९ लाख टन ऊस गाळप झाले आले असून आतापर्यंत २२५.३० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. देशातील सुमारे ८० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आतापर्यंत संपला आहे.

मागील हंगामात, २०२४-२५ मध्ये ५३२ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात भाग घेतला होता आणि १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ७५ साखर कारखाने बंद झाले होते. साखर कारखान्यांनी २१७६.९७ लाख टन ऊस गाळप करून १९७.८० लाख टन साखर उत्पादन घेतले होते. चालू हंगामात देशात साखरेची रिकवरी मागील हंगामापेक्षा जास्त आहे. आतापर्यंत देशात सरासरी साखरेची रिकवरी ९.३१% आहे, जी गेल्या हंगामात याच कालावधीत ९.०९% होती.

साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे, तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. NFCSF च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने आतापर्यंत ८९.८० लाख टन साखर उत्पादन केले आहे, तर उत्तर प्रदेशने ६५.६० लाख टन साखर उत्पादन केले आहे. कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे आतापर्यंत ४१.७० लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here