मध्य प्रदेश : भोरमदेव कारखान्यातर्फे ५.९७ कोटींची बिले वितरीत, शेतकऱ्यांना दिलासा

रायपूर : राज्य सरकारने छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कवर्धा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रामहेपूर येथील भोरमदेव सहकारी साखर उत्पादक कारखाना लिमिटेडने ५.९७ कोटी रुपयांची रक्कम वितरित केली आहे. उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ही शक्य झाले आहे. कारखान्याने आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५७.४८ कोटी रुपये दिले आहेत. या रक्कमेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंद आणि उत्साह पसरला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि कारखान्याचे अधिकृत अधिकारी, गोपाल वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना ऊस बिले देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारखाना व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, या सातत्यपूर्ण प्रक्रियेमुळे केवळ शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीच सुधारत नाही, तर कारखान्याच्या कामकाजातही सुधारणा होत आहे. कारखान्याने चालू गाळप हंगामात आतापर्यंत २.५५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून ३.०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. भोरमदेव सहकारी साखर कारखाना हा या भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी एक भक्कम आधारस्तंभ राहिला आहे. एफआरपीपेक्षा जास्त दर देऊन, शेतकऱ्यांना अनुदानित दरात साखरेचे वितरण करून आणि सुधारित बियाणे पुरवून हा कारखाना अग्रेसर राहिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here