भारताप्रमाणे पाकिस्तानही ऊस थकबाकीच्या फेर्‍यात 

नांदेरो : भारताप्रमाणेच पाकिस्तान सुद्धा ऊस थकबाकीच्या फेर्‍यात सापडलेला आहे. पाकिस्तानात अनेक साखर कारखान्यांनी अजूनही ऊस थकबाकी भागवलेली नाही. लरकाना आणि कंबर शाहदकोट जिल्ह्यातील ऊस शेतकर्‍यांनी नांदेरो साखर कारखान्याच्या गेटवर तीन वर्षांपासून राहिलेल्या थकबाकीबाबत धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व हुसैन बक्स भुट्टो, मलूक जाखरो, बदरुद्दीन मोहिल, ऐजाज करतियो आणि नजीर ब्रोही यांनी केले. याबरोबरच स्थानिक लोकही यामध्ये सामिल झाले होते.

आंदोलकांच्या हातात मोठ मोठे बॅनर होते आणि ते नांदेरो साखर कारखाना प्रशासनाविरोधात घोषणा देत होते. ऊस शेतकर्‍यांचे 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षात विकलेल्या ऊसाचे पैसे आजपर्यंत त्यांना मिळालेले नाहीत, असा आरोप शेतकर्‍यांनी केला होता. हा अन्याय आहे, असे सांगून ते म्हणाले, नांदेरो कारखान्याचे अधिकारी थकबाकी देवू इच्छित नाहीत.  ते म्हणाले, साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांनी यापूर्वीच साखरेचा साठा विकला होता, जी साखर त्यांच्या ऊसापासून करण्यात आली, पण अजूनही त्याचे पैसे अधिकार्‍यांनी भागवलेले नाहीत.

शेतकर्‍यांनी सांगितले की, ऊसाच्या शेतीसाठी परिवहन आणि बी बियाणे हे सारे उधारीवर घेतले असून ऊसाचे पैसे न मिळाल्याने ही उधारी शेतकरी भागवू शकलेले नाहीत. असा विचित्र व्यवहार करुन कारखान्याने आम्हाला आर्थिक अडचणीत टाकले आहे. गेल्या वर्षी 33 दिवसांपर्यंत धरणे आंदोलन केले होते, पण त्यातूनही कसलाही तोडगा निघालेला नाही. कारण स्थानिक सरकारनेच शेतकर्‍यांनी आपले डोळे आणि कान बंद ठेवले आहेत. ते म्हणाले की, आता ही जर पूर्ण पैसे मिळाले नाहीत तर आम्ही येथून हलणार नाही. सध्याच्या गाळप हंगामादरम्यान, ऊस पुरवठ्यासाठी आमच्यावर पुन्हा दबाव टाकला जात आहे. पण आता तिच चूक आम्ही पून्हा करणार नाही. जोपर्यंत ऊस थकबाकी मिळत नाही, तोपर्यंत ऊस पुरवठाही करणार नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here