बिजनौर : पाउस आणि धुक्यामुळे साखर कारखान्यांना पुन्हा एकदा संकटात टाकले आहे. पाउस आणि धुक्यामुळे साखरेच्या रिकव्हरीत पुन्हा घट झाली आहे. रिकवरी घटल्यामुळे साखर कारखान्यांना प्रति क्विंटल उसाच्या गाळपावर आठ रुपये इतके नुकसान होत आहे. जर वातावरणात लवकर फरक नाही पडला तर साखर कारखन्यांचे अधिक नुकसान होईल.
यावेळी साखर कारखान्यांसाठी धुके आणि सततचा पाउस संकट बनला आहे. पाउस आणि धुक्यामुळे साखरेच्या रिकवरीवर मोठा परिणाम होत आहे. अंदाज लावला जात आहे की, जानेवारीपर्यंत जिह्यातील साखर कारखाने 14 टक्क्यांपर्यंत रिकवरी प्राप्त करतील, पण आतापर्यंत असे झाले नाही. प्रत्येक दोन आठवड्यानंतर दोन ते तीन दिवसांपर्यंत पडणार्या पावसामुळे आणि धुक्यामुळे साखर कारखान्यांच्या रिकवरीवर ब्रेक लावला आहे. साखर कारखान्यांची रिकवरी वातावरणामुळे पूर्णपणे मिळत नाही. प्रति क्विंटर उसावर रिकवरी पुन्हा 25 टक्के कमी झाली आहे. पावसापूर्वी साखर कारखान्यांमध्ये एक क्विंटल ऊसापासून 11.50 किलो साखर बनत होती. पण आता हे प्रमाण घटले आहे. एक क्विंटल उसामध्ये आतापर्यंत 11.50 किलो साखर होती ती आता 11.25 क्विंटल इतकीच राहिली आहे. प्रति क्विंटल वर साखर कारखान्यांना आठ रुपयांचे नुकसान होत आहे.
धामपुर 10.25
स्योहारा 11.55
बिलाई 11.35
बहादरपुर 11.85
बरकातपुर 11
बुंदकी 10.25
चांदपुर 11.20
बिजनौर 11.30
नजीबाबाद 11.75
उसाच्या रोपांची पाने उन्हामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया करुन जेवण बनवतात. उसाच्या रोपांमध्ये बनवणार्या सुक्रोज मुळे साखर बनते आणि ग्लूकोंजला उस जेवणाच्या रुपात खात असतो. उन पडल्यामुळे ग्लूकोंज बनत नाही. तर रोप सुक्रोजला ग्लूकोजमध्ये बदलून खाते. पाउस आणि धुक्यामुळे उन कमी पडल्यामुळे कारखान्यांचे नुकसान झाले आहे. बिजनौर साखर कारखाना उस महासंचालक राहूल चौधरी यांच्या मतानुसार, कारखान्याच्या रिकवरी मध्ये घट होत आहे. जानेवारीमध्ये कारखान्यांची रिकवरी योग्यप्रकारे मिळत नाही.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.