मजुरांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत व लवकरात लवकर त्या सोडवल्या जातील: आमदार अमित कुमार

रीगा : लॉकडाऊन मुळे साखर विक्री ठप्प झाली आहे त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आहेत, अश्या मध्येच साखर कारखान्यामध्ये कार्यरत मजूरांचे धरणे प्रदर्शन शनिवारीही सुरु राहिले. संपाच्या पाचव्या दिवशी वर्कर्स यूनियनची स्थानिक आमदार अमित कुमार टून्ना यांनी भेट घेतली. आमदारांनी मजूरांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लवकरात लवकर या बाबत साखर कारखान्याशी चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले. साखर कारखान्याच्या मजुरांनी आपली विरोधी भूमिकेची माहिती सरकारच्या सर्व मोठ्या पदाधिकार्‍यांना दिली. या दरम्यान 32 दिवस झाल्यानंतरही मजुरांना हक्क मिळाला नाही. साखर कारखाना मजुर सभेचे नेते अवध झा आणि महासचिव अशोक सिंह यांनी सांगितले की, सरकारच्या चुकीच्या नितीमुळे साखर कारखाना आर्थिक संकटात सापडला आहे.

मजूर सभेचे अध्यक्ष रामबाबू राय यांनी सांगितले की, मजूरांवर जर खोटी केस चालवली तर कारखाना अधिकार्‍यांवरही खोटा दावा केला जाईल. या धरणे आंदोलनात मनोजकुमार सिंह, रामबाबू राय, अशोक कुमार सिंह, नंदलाल ठाकूर, भरत साह, अरुण कुमार सिंह यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here