पंजाबच्या मंत्र्यांनी ऊस शेतकर्‍यांसाठी केली बोनसची मागणी

पंजाबचे सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी बुधवारी सांगितले की, केंद्र सरकारकडून घोषित ऊस एफआरपीच्या दरातील वाढ खूपच कमी आहे.

एका निवेदनामध्ये ते म्हणाले की, केंद्र सरकारने ऊस शेतकर्‍यांना वाचवण्यासाठी पहिल्यापासूनच घोषित मूल्याशिवाय 70 रुपये प्रति क्विंटल दराने बोनसची घोषणा करावी. त्यानीं सांगितले की, बोनस थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केला जावा.

केंद्र सरकारने बुधवारी ऑक्टोबर 2020 पासून सुरु होणार्‍या पुढच्या विपणन वर्षासाठी ऊस मूल्य 10 रुपयांनी वाढवून 285 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here