अहिल्यानगर : आपत्तीजन्य परिस्थितीत एखादी दुर्दैवी घटना घडली, कामगार अचानक चक्कर येवुन पडला, अपघातात जखमी झाला, गंभीर भाजले, वायु गळती अशावेळी अपघातग्रस्तास दवाखान्यापर्यंत नेण्याच्या अगोदर त्याचा जीव वाचविण्यासाठी प्रथमोपचार म्हणून काय करावयास पाहिजे याबाबतचे प्रशिक्षण सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचा-यांना वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ डॉ. अजय सावंत यांनी मंगळवारी दिले.
प्रभारी कार्यकारी संचालक तथा साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कोल्हे यांनी कारखान्याच्या सभासद, शेतकऱ्यांसह कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्य प्राधान्य दिले आहे. व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी आपत्ती पथक, सुरक्षाजन्य सुविधा आदिंची माहिती दिली. सेफ्टी ऑफिसर सलमान शेख यांनी स्वागत केले. डॉ. अजय सावंत पुढे म्हणाले की, अपघातात जखमी झालेल्या कामगाराला अगोदर प्रथमोपचार दिले पाहिजे, त्यातुन त्याच्या जीवीतावरील संकट काही प्रमाणांत कमी होते. यावेळी एच. आर. मॅनेजर विशाल वाजपेयी उपस्थित होते. वैद्यकिय अधिकारी डॉ. एम. एच. बत्रा यांनी आभार मानले.