अहिल्यानगर : नागवडे सहकारी साखर कारखान्याकडून ४.७२ लाख टन गाळप

अहिल्यानगर : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा ५१ वा गळीत हंगाम अत्यंत यशस्वीपणे सुरू असून, आजअखेर ४ लाख ७२ हजार ३४० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. कारखान्याचा हंगाम १० फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली. जेवढे जास्त गाळप होईल, तेवढा फायदा संस्था आणि सभासदांचा होणार आहे. त्यामुळे १० फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवून आपला ऊस कारखान्यालाच देऊन सहकार्य करावे, असे आवाहन राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.

चेअरमन राजेंद्र नागवडे म्हणाले की, सध्या कारखान्यात सरासरी प्रतिदिन ६५०० मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे. अजून महिनाभर हंगाम सुरू राहणार असल्याने सर्व उसाचे गाळप वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. सहकारी साखर कारखाना ही तालुक्याची सहकार गंगोत्री असून विकासाची मूळ मातृसंस्था आहे. सहकार क्षेत्रासमोर अनेक आव्हाने असली तरी त्यावर मात करून आम्ही प्रगती करत आहोत. कारखान्याने चालू हंगामासाठी ३१५० रुपये प्रति टन असा उच्चांकी दर जाहीर केला आहे. यापैकी ३००० रुपयांचा पहिला हप्ता अदा करण्यात आला आहे. सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे कारखान्याचे कामकाज गतीने सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here