अहिल्यानगर : एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उसाची उत्पादकता वाढविण्याचे प्रतापराव पवार यांचे आवाहन

अहिल्यानगर : बारामतीचा ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, श्रीरामपूर येथील रयत शैक्षणिक संकुल व साई सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एआय तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावरकार्यशाळा झाला. यावेळी बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त व सकाळ वृत्तपत्र समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी मार्गदर्शन केले. ऊस पिकासह कोणत्याही नगदी पिकांतून शेतकऱ्यांना एकरी लाख रुपये मिळालेच पाहिजेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आहे. आपण ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून उत्पादन वाढीत यशस्वी झालो. या तंत्रज्ञानाच्या रुपाने शेतकऱ्यांच्या दारात गंगा आली आहे. त्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी ऊस उत्पादकता वाढवावी, असे आवाहन प्रतापराव पवार यांनी केले. कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय परिषद सदस्या मीनाताई जगधने होत्या. आमदार हेमंत ओगले, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के आदी उपस्थित होते. प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टची यशस्विता पाहून ऑक्सफर्ड व मायक्रोसॉफ्टने आधुनिक तंत्रज्ञान वापराबाबत करार केला. आम्ही एक हजार शेतकऱ्यांच्या शेतात या तंत्राचा यशस्वी वापर केला. त्यातून पाण्याची, औषधे व खतांची आणि खर्चात मोठी बचत झाल्याचे दिसून आले. पाण्याचा एकही थेंब वाया न जाऊ देता एकरी उत्पादन वाढले. अतिरिक्त खत, औषधांची मात्रा न दिल्याने शेतीचा पोत सुधारला, उसाचा उतारा वाढला. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यांच्यासह अप्पासाहेब पवार या दोघांची ही तपश्चर्या आहे. यावेळी आमदार हेमंत ओगले यांचे भाषण झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन समन्वयक डॉ. योगेश फाटके यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस उत्पादनातील नवतंत्रज्ञान’ यावर मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here