विजयवाड़ा: आंध्रप्रदेश सरकार च्या मंत्री समूहा (GoM) ने सहकारी साखर कारखान्यांना पुनर्जीवित करण्यासाठी उचलल्या गेलेल्या मुद्यांवर चर्चा केली. मेकापति गौथम रेड्डी (उद्योग), बोत्चा सत्यनारायण (नगरपालिका प्रशासन) आणि के कन्नबाबू (कृषि) यांच्यासह अनेक मंत्री इथे CRDA कार्यालयात भेटले. त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, पुढच्या गाळप हंगामापासून साखर कारखान्यांना पुनर्जीवित करण्याासाठी एका मास्टर प्लान ची तयारी करावी. साखर कारखान्यांच्या सध्याच्या समस्या वित्त आणि नागरीक पुरवठा विभागांशी संबंधीत आहे, या विभागांच्या अधिकाऱ्यांना सांगितले, त्यांनी पुढच्या बैठकीला उपस्थित रहावे.
गेल्या काही वर्षांपासून सहकारी साखर कारखाने आर्थिक समस्यांमुळे बंद आहेत, ज्यामुळे ऊस शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरी सहकारी कारखाने पुनर्जीवित करण्याची मागणी करत होते. आता आंध्रप्रदेश सरकार ने कारखाने पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.












