फिजी: लौटोका साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू, १.५ दशलक्ष टन गाळपाची अपेक्षा

सुवा : लौटोका साखर कारखान्यात २०२५ चा ऊस गाळप हंगाम अधिकृतपणे सुरू झाला आहे. गाळप हंगामाच्या प्रारंभप्रसंगी बोलताना, साखर उद्योग मंत्री चरणजित सिंग यांनी उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल लौटोका कारखान्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, हा कारखाना पश्चिमेकडील साखर उत्पादनाचे औद्योगिक केंद्र आहे आणि तो फिजीच्या आर्थिक लवचिकतेचे, कृषी वारशाचे आणि सामुदायिक ताकदीचे प्रतीक आहे.

त्यांनी सांगितले की, २०२४ मध्ये, लौटोका कारखान्याने ३६८,२६० टन ऊस गाळप करून ३१,४०३ टन साखर आणि १८,४०३ टन मोलॅसिस निर्मिती केली आहे. यावर्षी १.५ दशलक्ष टन ऊस गाळप होण्याची अपेक्षा आहे. यंदा २ लाख टनांची वाढ अपेक्षित आहे. मंत्री म्हणाले की, जर अशीच पद्धती चालू राहिली तर पुढील पाच वर्षांत उसाचे उत्पादन १ दशलक्ष टनांनी (१.३ दशलक्ष ते २.३ दशलक्ष टन) वाढवू शकेल. त्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी अनेक सरकारी सहाय्य कार्यक्रमाची रूपरेषा देखील सांगितली; यामध्ये शेतकरी प्रोत्साहन कार्यक्रम, मॅन्युअल लेबर सबसिडी, इनफील्ड ड्रेनेज कार्यक्रम आणि ऊस प्रवेश रस्ते आणि साखर विकास उपक्रमांचा समावेश आहे. सिंग म्हणाले की, सरकार या उपक्रमांचा वापर खर्च कमी करण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी आणि ऊस शेतीला अधिक आकर्षक, शाश्वत उत्पन्नाचा स्रोत बनवण्यासाठी व्यापक योजनेचा भाग म्हणून करत आहे. मंत्र्यांनी ऊस उत्पादकांना उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले. ते जितके जास्त ऊस लावतील तितके जास्त सहकार्य मंत्रालय करू शकेल, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here