रुड़की : इकबालपूर साखर कारखान्याकडून ऊसाची थकबाकी घेण्याऐवजी साखरेच्या स्कीम कडे शेतकरी वळत आहेत. आतापर्यंत शेतकर्यांनी 16 करोड ची साखर खरेदी केली आहे. शेतकरी सातत्याने साखर खरेदीसाठी साखर कारखान्यात येत आहेत.
इकबालपूर साखर कारखान्यावर शेतकर्यांचे गाळप हंगाम 2017-18, 2018-19 तसेच सध्याच्या गाळप हंगामाचे देय बाकी आहे. गेल्या दोन हंगामातील थकबाकीचे प्रकरण उच्च न्यायालयात विचाराधीन आहे. साखर कारखान्याला साखर विकून दोन्ही हंगामातील थकबाकी भागवणे गरजेचे आहे. ज्यामध्ये आतापर्यंत कारखान्याने आठ करोडचीच साखर विकली आहे. सध्याच्या गाळप हंमागामध्ये साखर कारखान्याने शेतकर्यांची थकबाकी भागवण्यासाठी एक ऑफर दिली आहे. साखर कारखान्याचे प्लांट हेड सुरेश शर्मा यांनी सांगितले की, साखर कारखान्याने शेतकर्यांना सांगितले की त्यांनी ऊसाच्या पावत्या जमा कराव्यात, त्या ऐवजी ते साखर घेवून जावू शकतात. यामुळे शेतकरी उत्साहात आहेत. आतापर्यंत साखर कारखान्याकडून 16 करोड रुपये किमीतीची साखर शेतकर्यांना विकली गेली आहे. प्लांट हेड सुरेश शर्मा यांनी सांगितले की, सध्याच्या हंगामात कारखान्याकडून एकूण 85 करोड रुपयांची थकबाकी भागवण्यात आली आहे. 58 करोड रुपये देय आहेत. हेदेखील लवकरच भागवले जातील. आशा आहे की, सध्याच्या गाळप हंगामाचे पूर्ण देयही भागवले जाईल.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.