नवी दिल्ली : भारत-अमेरिका व्यापार करार हा मुत्सद्देगिरी, विकास आणि सन्मानाचे “एक नवीन उदाहरण” आहे, असे प्रतिपादन करत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले. ते म्हणाले की, भारतीय शेतकऱ्यांच्या हिताची योग्य ती काळजी घेऊन हा करार करण्यात आला आहे.भारत-अमेरिका व्यापार करारामुळे अमेरिकेत भारतीय वस्तूंवरील शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे, तर अमेरिकेने दावा केला आहे की, या करारामुळे त्यांना भारताला अधिक कृषी उत्पादने निर्यात करण्यास मदत होईल.
चौहान यांनी पुढे सांगितले की, प्रमुख पिके आणि दुग्धव्यवसायासह प्रमुख कृषी क्षेत्रे “पूर्णपणे संरक्षित” आहेत. हा करार कोणत्याही प्रकारे देशांतर्गत कृषी हिताशी तडजोड करत नाही.या कराराच्या भारताच्या कृषी क्षेत्रावरील परिणामाबद्दल एएनआयशी बोलताना चौहान म्हणाले, हा व्यापार करार मुत्सद्देगिरी, विकास आणि सन्मानाचे एक नवीन उदाहरण आहे. आमचा संघर्ष नाही, तर संतुलित आणि सशक्त संवादावर विश्वास आहे. शेतकऱ्यांचे हित पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे हित पूर्णपणे सुरक्षित आहे. आमची मुख्य धान्ये, फळे, प्रमुख पिके आणि भरड धान्ये सर्व सुरक्षित आहेत. दुग्धजन्य पदार्थ सुरक्षित आहेत. (एएनआय)
















