कोल्हापूर : ‘एआय’ तंत्राचा वापर करून शेतकऱ्याने मिळवले एकरी १०० टन ऊस उत्पादन

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा येथील युवराज वारके या तरुण शेतकऱ्याने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी १०० टन ऊस पिकवला आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतीचा खर्चदेखील कमी झाला आहे. बारामतीच्या कृषी विकास केंद्रामार्फत मिळालेल्या मार्गदर्शनाचा वापर करून वारके यांनी दीड एकर क्षेत्रात ऊस लागवड केली. पाडेगाव येथून ८६०३२ चे उच्च दर्जाचे उसाचे वाण आणले. त्याची रोपे तयार करून शेतात लावले. आता एकरी १०० टन उत्पादन घेण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वारके यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून हवामानाचा अचूक अंदाज मिळवला. जमिनीतील पाण्याचे प्रमाण पाहून रोग व कीड नियंत्रण केले. खत व्यवस्थापनही केले. याचा फायदा म्हणजे कमी इनपुट खर्चात अधिक उत्पादन मिळाले. वारके यांनी केवळ ऊसाचेच नव्हे तर याआधी भात, केळी, भुईमूग यांसारख्या पिकांमध्येही उत्कृष्ट प्रयोग केले असून, त्यातही त्यांनी नफा मिळवला आहे. विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक जालिंदर पांगरे, उपसंचालक नामदेव परीट, इतर कृषी अधिकारी आणि ऊस तज्ज्ञांनी त्यांच्या शेताला भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here