लखीमपूर खेरी : तीव्र उष्णतेमुळे वाढल्या शेतकऱ्यांच्या अडचणी, ऊस पिकावर परिणाम

लखीमपूर खेरी : कडक उन्हामुळे ऊस पिक सुकत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कडक उन्हाचा त्रास वाढला आहे. पाणी टंचाईमुळे ऊस पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. उष्णतेमुळे सकाळी १० नंतर शेतकरी शेतात काम करू शकत नाहीत. कडक उन्हापासून थोडा आराम मिळावा म्हणून शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

पावसाअभावी ऊस पिकावर सर्वाधिक परिणाम होत आहे. पिके सुकू लागली आहेत. शेतकरी वेळेवर खते देऊ शकत नाहीत आणि पिकांची योग्य काळजीदेखील घेऊ शकत नाहीत. या परिस्थितीचा या भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here