महाराष्ट्र : साखर कारखान्याशी संबंधित ३५० कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात ईडीची छापेमारी

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मेसर्स केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इतर कंपन्यांशी संबंधित ३५० कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे टाकले. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. केंद्रीय एजन्सीकडून २३ मे रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत छापे टाकण्यात आले. केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांनी केलेल्या कथित मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या चौकशीचा भाग म्हणून नाशिक, कोपरगाव (शिर्डी) आणि ठाणे येथील परिसरांची झडती घेण्यात आली.

कंपनीने बनावट कागदपत्रांचा वापर करून ३५० कोटी रुपयांपेक्षा जास्त बँक कर्जे मिळवल्याच्या आरोपांवर ही चौकशी केंद्रित होती. वैयक्तिक फायद्यासाठी आणि मालमत्ता मिळवण्यासाठी हा निधी वळवण्यात आले आणि त्यांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, छाप्यादरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी ७०.३९ लाख रुपये रोख, सुमारे १.३६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, एक महागडी लक्झरी कार, १० लाख रुपयांचे डीमॅट खाती आणि शेअर्स, अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बेनामी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर गुन्हेगारी नोंदींसह अनेक मालमत्ता जप्त केल्या आणि गोठवल्या.

ईडीची चौकशी जालना पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर आणि त्यानंतर दाखल केलेल्या आरोपपत्रावर आधारित आहे. या प्रकरणात केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक दिनकर एस. बोडके आणि इतरांवर फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे, बनावट कागदपत्रांचा वापर आणि गुन्हेगारी गैरवर्तन यासारख्या कथित गुन्ह्यांचे आरोप ठेपले आहेत. ईडीच्या मते, केजीएस शुगरने कॅनरा बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाकडून कर्ज घेतले. सिव्हिल आणि इंजिनीअरिंग, खरेदी, बांधकाम (ईपीसी) कंत्राटदारांसोबत कायदेशीर व्यवसाय करार म्हणून बनावट संस्था आणि राउंड-ट्रिपिंग व्यवहारांच्या जटिल नेटवर्कद्वारे निधी वळवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here