साखर विक्री ठप्प असूनही महाराष्ट्रात भागवली जात आहेत ऊस बिले

पुणे : चीनी मंडी

अतिरिक्त साखर आणि लॉकडाउनमुळे साखर विक्री ठप्प होवून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांची ऊस बिले भागवण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत.

महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यांनी आतापर्यंत 95 टक्के एफआरपी भागवण्यात यश मिळवले आहे. 2019-20 गाळप हंगामात कारखान्यांनी शेतकर्‍यांकडून 549.98 लाख टन ऊस खरेदी केला होता. 15 मे पर्यंत, एफआरपी चे 13,121.69 करोड रुपये होतात. ज्यापैकी 12,548.30 करोड रुपये भागवले आहेत.

अतिरिक्त साखर साठ्याच्या समस्येतून सुटका करुन घेण्यासाठी कारखान्यांनी आता उसाबरोबरच इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोना संकटामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला तरीही साखर कारखाने हिमतीने या संकटाचा सामना करत आहेत. आता महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपला आहे.

इंडिनय शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) यांच्यानुसार, महाराष्ट्रात 15 मे 2020 पर्यंत 60.87 लाख टन साखर उत्पादन झाले होते, तर गेल्या वर्षाच्या 2018-19 च्या हंगामात उत्पादीत 107.15 लाख टनाच्या तुलनेत जवळपास 46.3 लाख टन कमी आहे. सध्याच्या गाळप हंगामात 145 कारखान्यांनी यापूर्वीच राज्यात गाळप कार्य बंद केंले आहे आणि सध्या केवळ 1 कारखाना सुरु आहे, तर गेल्या वर्षी याच तारखेला गाळप हंगाम 30 एप्रिल 2019 लाच संपला होता.
या हंगामात एकूण 146 साखर कारखान्यांनी गाळपात भाग घेतला होता. यंदा राज्यातील साखर कारखान्यांना दुष्काळ आणि महापुराचा सामना करावा लागला होता, ज्यामुळे साखर उत्पादन कमी झाले.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here