मुजफ्फरनगर : सर्वदलीय किसान प्रतिनिधी मंडळाने शेतकर्यांचा पूर्ण ऊस घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत मंसूरपूर साखर कारखाना बंद होवू न देण्याचा इशारा दिला आहे. वजन काट्याची तपासणी करण्यात आली. ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवण्याची मागणीही करण्यात आली.
मंसूरपूर सहकारी ऊस समितीवर सोमवारी सर्वपक्षीय शेतकरी नेत्यांच्या झालेल्या बैठक़ीत समिती सचिव विश्वामित्र पाठक यांच्याकडून ऊसाच्या मोफत स्लिप देण्याची मागणी करण्यात आली. सचिव यांनी 17 जून पासून मोफत स्लिप देण्याचे आश्वासन दिले. यानंतर प्रतिनिधी मंडळाने समिती सचिव यांच्याबरोबर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अरवींद दिक्षित यांची भेट घेतली आणि प्रदेश सरकार च्या निर्देशांनुसार शेतकर्यांच्या नेत्यांनी इशारा दिला की, एक एक ऊस घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद होवू दिला जाणार नाही. त्यांनी वजन काट्याची तपासणी करुन घेतली आणि ऊस थकबाकी लवकर भागवण्याची मागणी केली. कारखान्याच्या उपाध्यक्षांनी एक एप्रिल पर्यंत ऊसाचे पैसे देण्याचे आश्वासन दिले. बैठकीमध्ये भाजप नेते बोबंंद्र सहरावत, चेअरमन मनोज कुमार, पूर्व चेअरमन श्यामपाल सिंह, संचालक प्रल्हाद त्यागी, भूपेंद्र राठी, पंकज राठी, प्रमोद कुमार, धर्मसिंह, देवेंद्र, गौतम सिंह आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

















