पाटणा : येथील विकास भवनमध्ये नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, ऊस उद्योग मंत्री कृष्णनंदन पासवान यांनी पुढील वर्षी राज्यात ९ इथेनॉल कारखाने सुरू करण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, बिहारमध्ये साखर आणि इथेनॉल उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. नव्या कारखान्यांमुळे राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. या बैठकीत ऊस बिलांची स्थिती, आगामी हंगामासाठीचे सर्वेक्षण आणि साखर कारखान्यांचा विकास यावर चर्चा झाली.
शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यास कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नाही असा इशारा ऊस उद्योग मंत्री पासवान यांनी सर्व साखर कारखान्यांना इशारा दिला. साखर कारखान्यांनी आतापर्यंत ९९.८ टक्के ऊस देयक दिले आहे. मंत्री पासवान यांनी मुख्यमंत्री ऊस विकास योजना, यांत्रिकीकरण योजना आणि बिहार गुळ प्रोत्साहन योजनेची अंमलबजावणी गतीने करण्याचे निर्देश दिले. ऊस आयुक्त अनिल कुमार झा, संयुक्त ऊस आयुक्त जे. पी. एन. सिंह आणि बिहार आणि उत्तर प्रदेशातील कार्यरत साखर कारखान्यांचे महाव्यवस्थापक आणि कार्यालय प्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.